शनिवार, २६ जून, २०२१

आंबेओहळ प्रकल्पाचे घोडे गंगेत न्हाले...

 

आंबेओहळ प्रकल्पाचे घोडे गंगेत न्हाले...

तब्बल ३० वर्षाहून अधिक रेंगाळलेला आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) अखेर मार्गी लागला असे म्हणायला हरकत नाही. जून मध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे या प्रकल्पात पाणी साठ्यास सुरुवात झाली याचे समाधान वाटते. तत्कालीन आमदार बाबासाहेब कुपेकर यांनी हे धरण उभारण्याचे स्वप्न पाहिले ते सत्यात उतरले. उत्तूर परिसरील शेतीही पावसावरच, तो पडला की शेती पिकते नाहीतर मग काहीच नाही. हिरण्यकेशी नदी अथवा अन्य कोणत्याही पाण्याचा उपयोग या परिसराला झाला नाही. गेली कित्येक वर्ष या विभागातील सर्वच खेडी पिण्याच्या पाण्यासाठी विंधण विहिरीवरच आहेत. शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी आंबेओहळ प्रकल्पाचा विचार केला. या प्रकल्पाचे सर्व्हेक्षण सन ८० ते ९० च्या दशकात झाले अशी त्यावेळी चर्चा रंगायची.. कृष्णा खोरे लवाद मंडळाच्या निवाड्यानुसार मंजूर झालेला हा ७ टीएमसी प्रकल्प म्हणून या प्रकल्पाकडे त्यावेळी पहायले जायचे. सन २००० सालापासून या प्रकल्पाला गती निर्माण झाली. आंबेओहळची जागा  कोणती तर कर्पेवाडीच्या जवळ असलेली नेमकी जागा लोकांना समजली आणि सरकारची वाहने त्या ठिकाणी येवू लागली. या प्रकल्पाने पाणी उपलब्ध होणार असले तरी आठ दहा खेड्यातील चांगल्या प्रतिची जमीन बुडणार असल्याने पहिल्यापासूनच शेतकर्यांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध होता. गेल्या तीन चार वर्षापासून मात्र हा प्रकल्प पुन्हा शासनाने विचारात घेतला.  पुनवर्सन आणि सरकारने केलेले दुर्लक्ष यामुळे या प्रकल्पाला विरोध झाला. यामुळे प्रत्यक्षात सुरुवात होण्यास अडचणी आल्या. गेल्या काही वर्षात हा प्रश्न मार्गी लागला.
पोलीस बंदोबस्तात घळभरणी झाली त्यावेळीही शेतकरी व प्रकल्प संघटनेने आंदोलने केली. आता या  आणि प्रकल्पात पाणी साठले.. अनेक पुर्नवर्सनाचे प्रश्न अनेक मागे आहेत. शेतकर्यांचा अक्रोश कायम आहे. अजूनही काही शेतकर्यांना मोबदला मिळाला नाही अशा तक्रारी आहेत. प्रकल्पात पाणी साठा झाल्याने उत्तूर आणि गडहिंग्लज परिसर सुजलाम सुफलाम होणार असला तरी  जमीन देणारे शेतकर्यांना मात्र वार्यावर सोडू नये हीच अपेक्षा.. 


....................................................................................................................................................................

आंबेओहळ प्रकल्प मार्गी लागला आणि मी महागोंड बातमीदार म्हणून काम केलेली आठवण झाली.. या प्रकल्पाच्या सुरुवातीला २००० मध्ये अनेक बातम्या करण्याचा योग आला.. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मांडण्याचे प्रयत्न केले होते. ते दिवस पुन्हा आठवले.. त्या वेळची एक मिळालेली बातमी...

शनिवार, ८ मे, २०२१

 कोरोना रुग्ण आणि नातेवाईकांना जेवणाचा डबा देणारा बाळा भोसले...

आपल्याच गावातील गडहिंग्लज मध्ये कोरोना उपचारासाठी दाखल झालेल्या कोरोनाबाधीत रुग्ण आणि नातेवाईकांना जेवण कोण देणार हा प्रश्न मला पडला. हा आजारच असा आहे की, संसर्गाचा धोका अधिक मग आपल्या गावात असलेल्या कोरोनाबाधितांना जेवण देण्याचे काम गडहिंग्लजमध्ये नव्याने सुरु केलेल्या ताव फॅमिली रेस्टॉरंटचे मालक बाळा भोसले (गाव महागोंड) करत आहेत.  

कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा भयंकर आहे. यात कोरोनाची लागण होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच माझा गाव सापडला असे बाळा भोसले सांगत होते. या लाटेत मात्र अनेकांना जीव गमवावा लागला. अगदी जवळची माणसे सोडून गेली. काहींचं संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित झालं. त्यांच्या घरी डबे करायला कोणी नाही. अशा माझ्या गावातील रुग्ण व त्याच्या सोबत राहणार्याला जेवण देण्याचा निर्णय घेतला. गडहिंग्लज मध्ये मी हॉटेल नव्याने चालू केले, केवळ २० दिवसच हॉटेल चालू राहिले. लॉकडाउन झाले आणि हॉटेल बंद ठेवावे लागले. ही अडचण असली तरी रुग्णांची सेवा करायची आहे म्हणून मी निर्णय घेतला. गावात कोरोना झालेल्या आणि गडहिंग्लजला उपचाराला आल्यावर चौघांना जीव गमवावा लागला मात्र अनेक बरे होवून घरी गेले याचे समाधान आहे. 

या महामारीत अनेकांचे जेवणाचे हाल होत आहेत. माझ्या गावातील कोणी जेवनावाचून राहू नये, त्यांना मदत करायला हवी माझे पार्टनर संदीप याबाबत चर्चा केली त्याने देखील लगेच होकार दिला. मग आम्ही ही सेवा सुरु केली. हे काम सुरू करण्यामागे एकच भावना होती ती म्हणजे माझ्या माणसांचे हाल व्हायला नको. दोन घास देण्यासाठी माझ्याकडून जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत हे मी करत राहील. असेही बाळा भोसले सांगतात. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून त्यांनी याबाबतची माहिती लोकांपर्यंत पोहचवली. अनेकजण पैसे घेण्याचा आग्रह करतात पण मी घेत नाहीत. आपल्याला सेवा करण्याची गरज आहे. गरजूला मदत करता येत असल्याचे समाधान असेही सांगतात.